"सुख म्हणजे नक्की काय असत..."
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे" किती सुंदर ओळी आहेत या तुकाराम महाराजांच्या....

"सुख म्हणजे नक्की काय असत..."
"आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे"
किती सुंदर ओळी आहेत या तुकाराम महाराजांच्या....
आपण माणसे आनंद मिळवण्यासाठी खूप धडपड करत असतो.. आनंदाची व्याख्या व्यक्तीपरत्वे भिन्न असते.. प्रत्येकाचा आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा, ते आपल्या परीने जगण्याचा एक नियम असतो.. आनंदाचा अर्थ व्यक्तीपरत्वे भिन्न असतो.. प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रसंग, घटना वेगवेगळ्या असतात.. आणि त्या प्रसंगानिशी जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो.. आनंद हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात निरनिराळी रूपे घेऊन येतो.. म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याचा आनंद त्याच्या विचारांवर ठरवत असते. म्हणजे कुणाला संपत्तीत आनंद, कुणाला परोपकार केल्यावर आनंद मिळतो..तर काहींकडे सर्व असूनही ती व्यक्ती असमाधानी असते. सतत हे नाही, ते नाही, म्हणून अजून हव्यास बाळगत असते. पण खरं सांगायचं तर अति लोभाने सुख, आनंद मिळण्याऐवजी त्रास, वेदना अधिक होतात.. आपल्याकडे जे आहे, जितकं आहे, तेवढ्यात सुख मानून समाधानी रहायला हवं.. उगाच आयुष्याला दुषण देत, चांगल्या मिळालेल्या आयुष्याला असं झुरवत, दुखवत ठेवण्यात अर्थ नाही..
"दिले रे दैवाने, हे आयुष्याचे दान
आभार माणोन चित्ती असू दयावे समाधान", देवाने आपल्याला दिलेलं आयुष्य खूप सुंदर आहे.. मानव जन्म एकदाच, म्हणून तो भरभरून जगावं.. कुणाकडून कसलीही अपेक्षा न बाळगता आपण आपल आयुष्य जगत राहायला हवं.. कुणाची ईर्षा, घृणा, तिरस्कार बाजूला सारून आपण आपल सुख, आनंद कशात आहे हे पाहावं... आपल सुख पाहतांना दुसऱ्याला वेदना, त्रास होणार नाही याच भान ठेवलं की मनःशांती लाभते. अन आयुष्य आपोआप आनंदी होत.. रात्री शांत झोप येते, कारण कुठलाच पाप संचय आपल्या वाट्याला नसतो.. देव आहे ही सुंदर भावना मनात ठेवली की त्याला साक्षी मानून कोणाचं अघटित, वाईट आपण करूच शकत नाहीत.. कारण सर्वसाक्षी, परमेश्वर तो सार पाहत असतो.. आणि सुख भरभरून आपल्या पदरात घालत असतो. सुखाची वाट अनपेक्षित असते, ते अचानक येत. पण आपण त्या सुखाकडे पाठ फिरवून नसलेलं जे आहे ते शोधत बसतो.. नसलेल्या गोष्टींमागे धावण्यात आयुष्याचं सुख हरवून बसतो..
उदा. एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसा असतो, पण तो त्याचा सुयोग्य वापर करून, किंवा कुठेही दाणधर्म न करता किंवा स्वतःची कुठली चैन न भागवता अजून पैश्याच्या पाठी धावतो, परिणामी आयुष्याच्या शेवटी आनंद शोधत बसतो खऱ्या सुखाचा पण आता वेळ निघून गेलेली असते. मोजकेच काही क्षण हातात असतात अन तो साचवलेल्या धनाकडे निरखून पाहत असतो. पण त्या वेळी ते धन त्याला तो आनंद, te सुख देऊ शकत नाही जे त्याला हवं असत त्या क्षणी..
म्हणून "जिंदगी एक सफर है सुहाना,यहाँ कल क्या हो किसने जाना," म्हणत आयुष्याचं गीत गात राहावं..
निसर्ग भरभरून देतो आपल्याला.. कुठलीही अपेक्षा आपल्याकडून न बाळगता.. झाडें, वेली, सुंदर फुले, पक्षी, पाणी, नदी नाले, समुद्र.. किती सुंदर आहे हा निसर्ग जो आपल्यासाठी ईश्वराने निर्मिलेला आहे.. तो रोज उगवणारा भास्कर अनेक सुखे त्याच्या ओंजळीत घेऊन येतो अन आपल्या आयुष्यात आनंद निर्मितो, मग तरीही आपण खिन्न का असावे? उलट त्या उगवत्याला नमन करून त्याचे आभार मानत आपला दिनक्रम सुरु ठेवावा,मनी कुठलाही हव्यास, लोभ न बाळगता..
"जगी सर्व सुखी असा कोण आहे, वेड्या मना तू हे जाणुनी आहे" कशाला मग धडपड नको त्या सुखाची, दिले जे दात्याने, क्षणे करावी आनंदाची ".. आयुष्यात सुख शोधत राहिलो तर आयुष्य कधीच सुखी होणार नाही, त्यापेक्षा आहे त्यात सुख मानून जगत राहिलो की जगणं सुखी होईल.. अन आनंदाचा सोहळा रोज साजरा करता येईल..
शेवटी एकच" मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असत? काय पुण्य असत की जे घर बसल्या मिळत ".. तो देतोच अचानक, अनपेक्षित अन छप्पर फाडके आपण फक्त आपले विचार ठेऊ नये बोडके... 😊,
What's Your Reaction?






